बोलू नकोस काही

बोलू नकोस काही - समजून घे इशारे !
ये ना मिठीत माझ्या ! दे अंगावरी शहारे !

रेंगाळते कशाला ? ये ना ! निघून आता !
विझवून जा उरीचे - ते श्वास पेटणारे !

अत्ता मला समजले का ? फुलती कळ्या खुळ्या !
भेटीस सज्ज अपुल्या झाले गुलाब सारे !

चंद्रा तुला आता मी - दावेन पौर्णिमा !
म्हणशील "कोजागिरी" ला - "पेटते निखारे" !

आल्या नटून रात्री - बेधुंद गार वारा !
डोळ्यास पापणीचे - बघ जागते पहारे !

.............. मयुरेश साने ...दि.१२-फेब-११

प्रतिसाद

१ल्या आणि ४थ्या शेरात मात्रांची गडबड वाटते आहे.

अभिजीतशी सहमत.