करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही !
"लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते."मराठ्या उचल तुझी तलवार
आचार्य अत्रे यांच्या 'दैनिक मराठा'च्या पहिल्या अंकात (१५ नोव्हेंबर १९५६) मुखपृष्ठावर माझा भाऊ सुरेश ह्याची 'मराठ्या उचल तुझी तलवार' ही कविता छापण्यात आली होती. तेव्हा तो २४ वर्षाचा होता.
नात शरीफ (ध्वनीफित)
सप्टेंबर १९८७ मध्ये पुण्यात उर्दूचे मोठे अभ्यासक व शैलीदार स्तंभलेखक-पत्रकार, शिक्षक, समीक्षक जोए अन्सारी आले होते. अन्सारींच्या पुणेभेटीचे निमित्त साधून कवयित्री संगीता जोशी ह्यांच्या घरी एक अनौपचारिक बैठक झाली होती.ह्या मैफलीत कविवर्य सुरेश भट ह्यांनी त्यांच्या प्रसिद्ध नात शरीफचे काही शेर सादर केले होते. त्याचे हे ध्वनिमुद्रण.
