शब्दास ही आज माझ्या ये लाज ती जराशी
तोकडे कपडे हा आजकालचा प्रोब्लेम झाला आहे. बाब अशी की प्रश्न ज्याचा त्याचा आहे; पण कधी कधी हे जरा अतीच होतं.. मग अशी गझल लिहावी वाट्ते....
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते !
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !
तांत्रिकदृष्ट्या निर्दोष नसलेल्या गझला इथे हलविण्यात येतील.
तोकडे कपडे हा आजकालचा प्रोब्लेम झाला आहे. बाब अशी की प्रश्न ज्याचा त्याचा आहे; पण कधी कधी हे जरा अतीच होतं.. मग अशी गझल लिहावी वाट्ते....
माझ्याकडे जगाचे हसणे उधार आहे....
त्या कोवळ्या कळीचे फुलणे उधार आहे....
घाय
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
दोस्तांतला कुणी कधीच हरला नाही
एकांत बोचरा सरात सरला नाही
पाण्यात पाहुनी नभात उडता कोणी
आधार द्यावया जळी उतरला नाही
खोळंबले कधी सुवर्णकण अस्ताशी
संधिप्रकाश तो पुन्हा पसरला नाही
रात्रीस काजवे खुशाल लपले रानी
अंधार साथ ही कधी विसरला नाही
पंखांत चंद्र तो जरा वितळला रात्री
सूर्यास पाहता परांत ठरला नाही
चूक भुल क्षमस्व !
डॉ. स॑तोष कुलकर्णी सरा॑च्या सहवासतून निर्माण झालेले गझलचे सुप्त आकर्षण आणि मित्रा॑चा 'काहितरी लिहित जा' असा आग्रह यामुळे गझलचे जुजबी ज्ञान आसतना ( मात्रा,बहर,व्रताचा फारसा विचार न करता)लिहिण्याची हि॑म्मत केली त्याबद्दल क्षमस्व !
माधव भा॑गे, उदगीर.
bmadhav4u@yahoo.com
मी गझल शिकते आहे.त्यामुळे कॄपया ज्या चुका आढळतील त्या मान्यवर वाचकांनी सांगितल्या तर मला रचनेत सुधारणा करता येतील,धन्यवाद
चितेतही न जळलो मीचिंतेत तुझ्या,असा जळलो मीनिखारेही कधी ना पोळले शब्दांनी तुझ्या,असा होरपळलो मीबुडालो दुःखात माझ्याच असा माझाच मला, कधी न कळलो मीपाहून लागली हळद तुलाहाय रे दैवा,नुसताच हळहळलो मीऋतू आले नी गेले ना फुललो कधीआलीस तू ,नुसत्या जाणिवेने सळसळलो मीजुमानले ना संकटांनाही कधीनसण्याने पण तुझ्या,लक्षापासून ढळलो मीमारल्या हाका त्यांनी कितीहीप्रेत्येकवेळी,असशिल तू म्हणूनी वळलो मीचिवट असा की लवकर ना पेटलोचितेतही,नुसताच धुराने मळलो मीशिवलो ना पिंडास मीच माझ्यायेशील आता तरी,वेळ किती घुटमळलो मीजराही तुझी वाट न पाहीली त्यांनीकेला दर्भाचा कावळा,पाहून कळवळलो मी
निखारे ही ना कधी पोळले मला
असा शब्दांनी तुझ्या पोळलो मी
चितेनेही न जाळले मला
चिंतेत तुझ्या असा जळालो मी
बुडालो दुःखात माझ्याच असा की
माझाच मला न कधी कळालो मी
ऋतू आले नी गेले फुललो ना कधी
आलीस तू नुसत्या जाणिवेने सळाळलो मी
संकटांनाही जुमानले ना कधी
नसण्याने तुझ्या,जिवनापासून पळालो मी
मारल्या हाका त्यांनी कितीही
प्रेत्येकवेळी असशिल तू म्हणूनी वळालो मी
चिवट असा की लवकर ना पेटलो
चितेतही नुसताच धुराने मळालो मी
शिवलो ना पिंडास मीच माझ्या
येशील आता तरी वेळ किती घोटाळलो मी